सत्यशोधक समाज : भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उंबरठ्यावर, अनेक समाज सुधारकांनी सर्व सामाजिक अंधश्रद्धा दूर करून समाजाला प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला. यातच महत्वपूर्ण कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले असेच एक व्यक्तिमत्व होते ज्यांचे उद्दिष्ट वंचित वर्गाला हक्क आणि न्याय देऊन त्यांचे समर्थन करणे होते. या लेखातून आपण सत्य शोधक समाज विषयी माहिती पाहणार आहोत. सत्यशोधक समाज मराठी माहिती
सत्यशोधक समाजाची स्थापना
- ‘२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे चाहते व अनुयायी यांची सभा घेऊन सत्य शोधक समाजाची स्थापना पुणे येथे केली .
- आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील ही महत्त्वाची घटना आहे . मराठी प्रदेशात ग्रामीण व अज्ञानी जनतेपर्यंत पोहोचलेली ही पहिलीच चळवळ होय .
- फुले यांनी ‘ सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक ‘ हा ग्रंथ लिहिला होता . वि . रा . शिंदे यांच्या मते , ‘ हे पुस्तक सत्यशोधक समाजाचे ‘ बायबल ‘ होते . ‘ या ग्रंथातील फुले यांचे विचार हे सत्य शोधक समाज व चळवळ याचा मुख्य आधार होते . या ग्रंथात सत्य शोधक समाजाची तत्त्वेही सांगितली होती.

सत्यशोधक समाजाची कोणती तत्वे होती
१ ) ईश्वर म्हणजे ‘ निर्मिक ‘ हा एकच आहे . तो सर्वव्यापी , निर्गुण , निर्विकारी आहे . त्याने प्राणिमात्रांच्या उपभोगासाठी विविध वस्तू तयार केल्या आहेत .
२ ) “ एक ईश्वर , एक धर्म ‘ या तत्त्वाचा फुले यांनी पुरस्कार केला होता . ते म्हणत , ‘ मानवाचे धर्म नसावे अनेक । निर्मिक एक । ज्योती म्हणे । कोणास न पिडी । कमावले खाई। सर्वा सुखा देई आनंदात । खरी हीच नीती । मानवाचा धर्म । बाकीचे अधर्म । जोती म्हणे ॥”
३ ) दगड किंवा धातूच्या मूर्तीची पूजा करणे हा ईश्वरसाधनेचा मार्ग साफ चुकीचा आहे परमेश्वरांची विविध रूपे कल्पून भजन – पूजन , कीर्तन करू नये .
४ ) निर्मिक ‘ हा सर्वार्थाने परिपूर्ण आहे . त्याला कशाचीही गरज नाही . नैवेद्य अन्नदानाची त्यास गरज नाही . सर्व माणसे ही परमेश्वराची लेकरे आहेत .
५ ) दैव , नशीब , ब्रह्मलिखित , पूर्वसंचित या गोष्टीवर विश्वास ठेवू नये .
6) नवससायास , मंत्रतंत्र , व्रतवैकल्ये , तीर्थयात्रा , स्वर्ग – नरक , जपजाप्य इत्यादी गोष्टीस सत्यशोधक समाजाचा विरोध होता .
७ ) ग्रहशास्त्रे , नक्षत्रे , राशी , ज्योतिषशास्त्रावरही फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा विश्वास नव्हता .
८ ) श्रद्धा , पिंडदान , मृत मातापित्यांना खूश करण्यासाठी द्यावयाची ब्राह्मण भोजने , इतर दानधर्म , पापपुण्य इत्यादीवर फुले यांचा विश्वास नव्हता .
९ ) सर्व धर्मग्रंथ हे मानवनिर्मित आहेत .
सत्य शोधक समाजाचे उदिष्ट
कनिष्ठ जातीतील लोकांना ब्राह्मणांच्या व ब्राह्मण्यांच्या सामाजिक , धार्मिक , आर्थिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे सत्य शोधक समाजाच्या स्थापनेमागचे प्रमुख उद्दिष्ट होते. या समाजाचे सभासदत्व सर्व जातींसाठी खुले ठेवले होते . ब्राह्मण महार , मांग , ज्यू हे सुरवातीला सत्यशोधक समाजाचे सभासद होते .
सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य :
सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥‘ हे सत्य शोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते.
सत्यशोधक समाजाचे महत्वाचे टप्पे
संघटनात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून सत्य शोधक समाजाच्या वाटचालीचे ४ टप्पे पडतात .
- १ ) इ.स.१८७३-१८९ ० या काळात पुणे , मुंबई या भागात ही चळवळ विस्तार पावली .
- २ ) इ.स .१८ ९०-१९ १० या काळात विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चळवळ विस्तार पावली
- ३ ) इ.स .१ ९१०-१९ १ ९ या काळात सत्य शोधक समाजाची वार्षिक अधिवेशने विदर्भातही चळवळीचे लोण पोहोचविले . भरवली गेली . शाहूच्या सहकार्याने व प्रेरणेने पश्चिम महाराष्ट्र व सत्य शोधक समाजाची चळवळ ही अत्यंत सक्रिय होती .
- ४ ) इ.स. १ ९ १ ९- १ ९ ३८ : – या काळात सत्य शोधक समाजाच्या चळवळीचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळ व पक्षात झाले . मूळ आशय मागे पडून सत्यशोधक चळवळीने राजकीय स्वरूप धारण केले .
- इ.स. १८ ९०-१९ १० या काळात सत्य शोधक समाजाची चळवळ मात्र खूपच थंडावली होती . यास प्रामुख्याने फुले यांची मृत्यूपूर्वीची विकलांग अवस्था , सावित्रीबाई फुले व नारायण लोखंडे यांचे निधन ,
- इ.स .१८९६-१९ ०२ या काळात मुंबई प्रांतात दुष्काळ व प्लेगची साथ , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सत्यशोधकांचे लक्ष केंद्रित होणे व राष्ट्रीय चळवळीचा वाढत गेलेला जोर आदी गोष्टी कारणीभूत होत्या .
- इ.स. १९१७-२२ या काळात सत्यशोधकांनी सत्यशोधक चळवळीचा विचार ग्रामीण भागात पोहोचविण्याचे फार मोठे कार्य केले होते .
- सत्य शोधक समाजाचे कोणीही सभासद होऊ नये असे प्रयत्न ब्राह्मण करीत . सत्य शोधक समाजाचे जे सभासद होते त्यांना ब्राह्मण अधिकारी त्रास देत . ब्राह्मणांच्या गैरहजेरीत जी लग्ने लावली गेली ती लग्नेच नव्हेत , अशी ओरड सनातनी ब्राह्मणांनी केली होती .
सराव प्रश्न सरळ सेवा भरती : 2025
सत्यशोधक समाजाचा परिणाम काय झाला .
- १ ) ग्रामीण भागात शिक्षणाचे लोण पोहोचण्यास मदत झाली . बहुजन समाजात शिक्षणाची आवड निर्माण झाली . जागृती निर्माण झाली .
- २ ) धर्माच्या नावाखाली ब्राह्मण जे शोषण करत त्याबाबत शूद्र व अतिशूद्र समाजात गेले . सत्यशोधक कार्यकर्त्यांनी हाच विचार कृतीने पुढे नेला
- ३ ) कमी खर्चात ब्राह्मण पुरोहिताच्या गैरहजेरीत त्यांनी लग्ने लावली . त्याशिवाय वास्तुशांती , दशपिंडविधी व इतर धार्मिक विधीतही ब्राह्मणांचे वर्चस्व नाकारले.
- ४ ) सत्य शोधक समाजाच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविली गेली गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या . सहभोजनाचे कार्यक्रम हाती घेतले गेले . निबंधस्पर्धा आयोजित केल्या गेल्या . गाजिन
- ५ ) जातिभेद , वर्णव्यवस्था , सावकारशाही , पुरोहितशाही व मूर्तिपूजेला मोठा धक्का दिला.
- ६ ) इ.स. १८७६-७७ मध्ये मुंबई प्रांतात दुष्काळ पडला. तेव्हा सत्यशोधक समाजाने पत्रक काढून पुणे – सांगली , सातारा भागातील दुकाळग्रस्तांना मदत करावी असे आवाहन केले होते. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष मदतही केली.
नेहमी विचारलेली प्रश्न
- सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
- सत्य शोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली.
2. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य कोणते ?
- सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥‘ हे सत्य शोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते.
3. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी करण्यात आली?
- महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्य शोधक समाजाची स्थापना केली.